Old Pension : जुनी पेन्शन प्रणाली हा कर्मचाऱ्यांबाबतचा मुद्दा मागील अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गाजत आहे. राजस्थान, छत्तीसगड या सोबतच पंजाब सरकारने आता जुनी पेन्शन प्रणाली लागू केली नसून या राज्यांच्या मागोमाग आता हिमाचल सरकारने देखील जुनी पेन्शनची प्रणाली लागू केलेली आहे.
अशातच मित्रांनो जुन्या पेन्शन बाबत एक मोठे अपडेट आपल्यासमोर आलेले आहे. शासनाने याबाबतची महत्त्वाची माहिती आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना नक्कीच धक्का बसला आहे. जुन्या पेन्शन बाबत शासनाने पूर्णपणे खुलासा केला असून या खुलासा मध्ये नेमके काय आहे यासोबतच कर्मचाऱ्यांनी केलेली मागणी मान्य होईल का? या विषयाकडे सगळ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
जुनी पेन्शन योजना ही शासनाची अतिशय घातक ठरणारी योजना आहे. असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. याबाबत आता आरबीआयच्या माझी गव्हर्नरच्या माध्यमातून इशारा देण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे बघितले तर राजस्थान झारखंड छत्तीसगड यासोबत विविध गरीब श्रेणीमध्ये मोडणाऱ्या राज्यांमध्ये या माध्यमातून वार्षिक पेन्शनदायित्व करण्यासाठी एकूण तीन लाख कोटी रुपये करण्यात आले आहेत.
नवीन आणि जुन्या पेन्शन योजनेमध्ये खूपच फरक आपल्याला आढळून आला आहे. पेन्शन धारकांकडून यासोबतच कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना याबाबत पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली आहे. ओ पी एस च्या मध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पगाराच्या निम्मी पेन्शन मिळत असते.
नवीन पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांचा जो पगार आहे त्या पगाराच्या दहा टक्के डीए हा कापण्यात येतो. याशिवाय जुन्या पेन्शन योजनेची विशेष बाब म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पगारातून देखील पैसे कापले जात नाहीत.
एवढेच नाही तर मित्रांनो नवीन पेन्शन आयोग मध्ये सहा महिन्यानंतर डीए मिळण्याची तरतूद दिलेली नाही. जुन्या पेन्शन मध्ये हे पैसे शासनाच्या तिजोरीतून नागरिकांना दिले जातात. नवीन पेन्शनमध्ये निश्चित पेन्शनची अशी कोणतीही हमी ग्राह्य धरण्यात आली नाही.
आढळते खूप मोठी तफावत
मित्रांनो जुन्या पेन्शन योजनेबाबत सविस्तर बोलायचे झाले तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मृत्यूनंतर सुद्धा त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना समजा जर एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला सध्या 80 हजार रुपये प्रति महिना पगार असेल. तर निवृत्तीनंतर जुन्या पेन्शन योजनेच्या माध्यमातून त्याला सुमारे 30 ते 35 हजार रुपये इतकी पेन्शन सुरू राहणार आहे. याशिवाय नवीन पेन्शनमध्ये या कर्मचाऱ्याला फक्त 800 ते 1000 रुपये पेन्शन मिळेल इतका फरक दिसून येईल.
यांना लाभ मिळणार
अलीकडे नवी दिल्ली मधील उच्च न्यायालयाने केंद्रीय निमलष्करी दलातील नागरिकांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्याचा निर्णय ग्राह्य धरला आहे. कोर्टाने सांगितल्याप्रमाणे हे एक सशस्त्र दल असल्यामुळे या लोकांना याचा लाभ घेता येईल. ते नागरिक या योजनेसाठी पात्र असू शकणार आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता हजारो माजी सैनिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026