राज्य शासन सेवेत तब्बल 1 लाख पदांसाठी पदभरती प्रक्रिया करण्याची मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे .यामुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना राज्य शासन सेवेत नोकरीची संधी मिळणार आहे .सदर 1 लाख पदांपैकी पहिल्या टप्यातील भरती प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे .यासाठी राज्यातील विविध विभागांकडुन रिक्त पदांचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे .
राज्य शासन सेवेत मंजुर पदांपैकी तब्बल अडीच लाख पदे रिक्त आहेत .यामुळे कर्मचाऱ्यांचा कामाचा मोठा ताण येत आहे .परिणामी प्रशासकीय कामकाज लांबणीवर पडत असल्याने नागरिकांचे कामकाज वेळेत होत नसल्याने , मुख्यमंत्री महोदयांनी रिक्त पदांचा अहवाल सादर करण्यास राज्यातील सर्व विभागांना आदेश देण्यात आलेले आहेत .पहिल्या टप्यामध्ये 1 लाख पदांपैकी 70 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात येणार असल्याची माहीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली .सदर भरती प्रक्रिया मंत्रीमंडळ विस्तारानंतर तात्काळ राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी दिली आहे .
यामुळे राज्यातील रिक्त पदांपैकी 50 टक्के जागांवर म्हणजेच 70 हजार जागांवर पदभरती प्रक्रिया आयोजित करण्यात येईल .यामध्ये वर्ग -3 व वर्ग 4 पदांसाठी सरळसेवा पद्धतीने परिक्षेचे आयोजन करण्यात येईल .तर काही पदे हे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत .
- मुंबई येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती, अर्ज करायला विसरु नका !
- भांडारपाल , लिपिक , शिपाई , प्रयोगशाळा सहाय्यक , प्राध्यापक इ. पदांसाठी थेट पदभरती !
- केंद्रीय गृह विभाग मध्ये 3500+ जागांसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !
- प्राध्यापक , ग्रंथपाल , वसतिगृह वॉर्डन , लिपिक व शिपाई पदांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरू नका !
- नविन शैक्षणिक संस्था अनुदानित / विनाअनुदानित शाळांमधील रिक्त पदांवर पदभरती !