राज्यातील नागरिकांसाठी राज्य सरकारने एक मोठी आनंदाची योजना सुरु करण्यात येणार आहे .या योजनेनुसार आता राज्यातील लाभार्थींना रेशन धान्याऐवजी पैसे थेट बँक खात्यांमध्ये मिळणार आहे .या योजना अंतर्गत राज्यातील तब्बल 40 लाख लाभार्थ्यांना थेट लाभ मिळणार आहे . राज्य शासनाची धान्याऐवजी पैसे योजनेविषयी सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .
राज्य शासनाने स्वस्त दरामध्ये धान्य देण्याची योजना बंद करुन आता लाभार्थ्यांना बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत . याकरीता लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न हे 59 हजार ते 1 लाख रुपये पर्यंत असणे आवश्यक आहे .यापुर्वी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना , 2 रुपये किलो गहु आणि 3 रुपये किलो तांदूळ स्वस्त धान्य दुकानातुन देण्याची योजना सुरु करण्यात आलेली होती .
सध्या केंद्र सरकारकडून स्वस्त धान्य योजना अंतर्गत धान्य पुरवठा होत नसल्याने , राज्य सरकारकडून धान्याऐवजी पैसे देण्याची योजना तयार करण्यात आलेली आहे .एका व्यक्तीला महिन्याला 9 हजार रुपये तर कुटंबात चार जण असल्यास त्या कुटुंबाला वर्षाकाठी 36,000/- रुपये देण्याचा प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा विभागाने तयार केला आहे .
धान्याऐवजी पैसे दिल्याने , नागरीकांच्या इतरही गरजा या पैशांतुन पुर्ण होणार आहेत .यामुळे राज्य सरकारकडून धान्याऐवजी पैसे या योजनेला पाठिंबा देण्यात येत आहे .
- LIC : एलआयसी हाउसिंग फायनान्स लि.अंतर्गत 180 रिक्त जागेसाठी पदभरती !
- MCL : महानदी कोलफील्डस् लि. अंतर्गत 500 रिक्त जागेसाठी पदभरती !
- POWERGRID : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 668 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- मालेगाव पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या 28 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर , अंतर्गत विविध पदांसाठी थेट पदभरती !