तलाठी मेगाभरती : महाराष्ट्र शासन सेवेत तलाठी पदांच्या एकुण 4,000 रिक्त जागांसाठी महाभरती ! असा करा अर्ज !

Spread the love

शासनाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र राज्यांमधील विविध जिल्ह्यात तलाठी भरती घेण्यात येणार असून या भरतीसाठी जे कोणी इच्छुक उमेदवार असणार आहेत त्यांना लवकरात लवकर अर्ज भरता येतील. लवकरात लवकर याचा जीआर देखील शासन आणणार आहे.

भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी अशाप्रकारे शैक्षणिक पात्रता असावी.

अर्जदार विद्यार्थी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचा स्वतः पदवीधर असला पाहिजे. नोट केलेल्या माहितीनुसार संगणक तंत्रज्ञान विषयी माहिती असलेल्या विशेष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे.यासोबतच अर्ज करणाऱ्या उमेदवारास मराठी आणि हिंदी भाषेचे ज्ञान असावे.

वयाची अट

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची अटी 18 ते 38 वय वर्ष पर्यंत असणार आहे. मागासवर्गीय प्रवर्गासाठी 18 ते 43 वय वर्षाची अट असणार आहे. खेळाडूंसाठी 18 ते 43 वय वर्षापर्यंत वयाची अट असणार आहे. प्रकल्प या सोबतच अपंग किंवा भूकंपग्रस्त व्यक्तींकरिता 18 ते 43 वय वर्ष पर्यंतचे अट असणार आहे. आणि माजी सैनिक असलेल्या उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्षे अट असणार आहे.

तलाठी भरतीच्या परीक्षेचे स्वरूप अशाप्रकारे असेल.

– बौद्धिक चाचणी करिता 25 ते 50 प्रश्न असतील

– सामान्य ज्ञान करिता 25 ते 50 प्रश्न असतील

– इंग्रजी भाषेसाठी 25 ते 50 प्रश्न असतील

– मराठी भाषेसाठी 25 ते 50 प्रश्न असतील

– व यामध्ये एकूण गुण 100 किंवा 200 पर्यंतचे असतील

ह्या अंतर्गत काही दिवसातच एक हजर होऊन अधिक तलाठी यांच्या पदांसाठी भरती महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये होणार असून यासाठी लवकरच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यासोबतच लवकरच या भरतीचा जीआर देखील प्रकाशित केला जाईल. ज्यावेळी अर्जाची प्रक्रिया चालू होईल त्यावेळी त्या संबंधित माहिती लवकरात लवकर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.

Leave a Comment