शिंदे-फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय : घरगुती व कृषी पंप विजबिल सरसकट माफ !

Spread the love

राज्यातील नागरिकांना आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे घरगुती व कृषी पंप विजबिल सरसकट माफ करण्याचा मोठा निर्णय शिंदे – फडणवीस सरकारने घेतला आहे .यामुळे राज्यातील गरीब व आर्थिक दृष्ट्या मागास नागरिकांना विजबिलांमध्ये मोठी सवलत मिळणार आहे . या संदर्भातील सविस्तर बातमी पुढीलप्रमाणे पाहुयात .

राज्यातील अनेक ग्राहकांचे थकित विजबिलांमुळे महावितरण कंपनी कडून विजपुरवठा खंडीत करण्यात आलेला होता .त्याचबरोबर कृषी पंप शेतकऱ्यांचे देखिल कृषी पंपाचे विजबिल मोठ्या प्रमाणात थकित असल्याने महावितरण कंपनीकडून सदर शेतकऱ्यांचे विज पुरवठा खंडित केल्याने , शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत होता .

यामुळे शिंदे – फडणवीस सरकारने घरगुती व कृषी पंप विजबिल सरसकट माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे . यामध्ये ज्या ग्राहकांचे विजबिल थकित वीजबिल न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडीत करण्यात आलेला होता . अशा ग्राहकांचे वीजपुरवठा पुन्हा सुरु करण्याकरीता थकित वीजबीलापैकी फक्त 50 टक्केचे रक्कम भरावी लागणार आहे . उर्वरित 50 टक्के रक्कम राज्य शासनांकडून भरले जाणार आहे .

थकित वीजबिलावरील व्याज देखिल माफ करण्यात आले असून , केवळ थकित बिलांपैकी व्याज वगळून 50 टक्केच रक्कम भरावी लागणार आहे . यामुळे राज्यातील नागरीकांना वीजबिलांमध्ये मोठी सवलत मिळाली आहे .

Leave a Comment