महाराष्ट्र राज्यातील घरगुती विजबिल ग्राहकांना महाराष्ट्र शासनाने मोठी सवलत दिली आहे .राज्यातील ज्या घरगुती वीज ग्राहकांचे वीज विलांच्या थकबाकीपोटी कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे .अशा सर्व घरगुती व कृषी वीजग्राहकांना वीजबिल सरसकटपणे माफ करण्याचा राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे . या संदर्भातील सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे पाहुयात .
विलासराव देशमुख अभय योजना –
राज्य शासनाकडुन राज्यामधील घरगुती त्याचबरोबर व्यवसाय तसेच उद्याग वीजग्राहकांना अभय देणेकरीता विलासराव देशमुख ( यांच्या स्मरणार्थ ) अभय योजना राबविली जाते .या योजने अंतर्गत राज्यातील ज्या वीज ग्राहकांचे वीज थकबाकीपोटी कायमस्वरुपी खंडित करण्यात आलेली आहे .अशा ग्राहकांना पुन्हा वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या हेतुन त्यांच्या थकबाकीची रक्कम सरसकट माफ करण्याचा राज्य शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे .जेणेकरुन थकबाकीपोटी खंडित करण्यात आलेला विजपुरवठा पुन्हा सुरु करण्यात येईल .
या योजना अंतर्गत असा घ्या लाभ –
या योजना अंतर्गत थकित वीजबिल ग्राहकांनी आपल्या थकित रक्कमेपैकी 90 टक्के रक्कमेचा भरणा करावा लागणार आहे .यामध्ये व्याजाची रक्कम वगळण्यात येणार आहे . म्हणजेच ग्राहकांना 10 टक्के विजबिल सवलत त्याचबरोबर व्याजाची रक्कमेमध्ये देखिल मोठी सुट मिळणार आहे . या योजनाची मुदत संपुष्टात येत असल्याने राज्य शासनाने या योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी 31.12.2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे . यासाठी आपल्या जवळच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून या योजना अंतर्गत लाभ घेवू शकता .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026