नविन योजना : घरात मुलींच्या जन्मानंतर पालकांना मिळणार 50,000/- रुपये !

Spread the love

सरकारने एक नवीन योजना तयार केली आहे. मुलीचा जन्म हा नशीबवाल्यांच्या घरात होते. मुलगी ही एक अशी कळी आहे ती फक्त नशीबवाल्यांच्याच घरात उमलते असे समजले जाते. या मुलीसाठी सरकारने नवीन योजना तयार केली आहे. जेव्हा मुलीचा जन्म झाला तेव्हा त्या मुलीच्या पालकांना 50 हजार रुपये सरकार कडून देण्यात येत आहे. अशी तरतूद या योजनेत नमूद केली आहे.

देशातील लोकांचे आर्थिक हित लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकार अनेक प्रकारच्या योजना राबवित असतात. तसेच आपल्या देशात मुलींसाठी सरकारने नवीन योजना तयार केली आहे. त्या योजनेचे उद्दिष्टे आपण जाणून घेऊया. सरकार माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा विकास करत आहे.या योजनेत मुलीच्या जन्माच्या वेळी पालकांना 50,000 हजार रुपयाची आर्थिक सहाय्य करीत आहेत.ही योजना 1 एप्रिल 2016 पासून अमलात आणली आहे. या योजनेतून ज्या पालकांना 2 मुली झाल्या ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक अर्ज करावा लागेल आणि तो अर्ज करण्याची प्रक्रिया फार सोपी आहे. हा अर्ज करण्यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. या नोंदणीसाठी तुम्हाला सरकारच्या सरकारी विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.त्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला माझी कन्या भाग्यश्री हा फॉर्म डाऊनलोड करावा लागेल. हा फॉर्म डाऊनलोड झाल्यानंतर तो पद्धतशीरपणे भरावा लागतो. त्यामध्ये आपली पूर्ण माहिती भरून त्याला काही कागदपत्रे जोडावे लागते.

त्यानंतर तो फॉर्म महिला व बाल विकास कार्यालयात जमा करावा लागतो. जर तुम्ही या योजनेत अर्ज करत असाल तर काही कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे. या योजनेत कोणतेही कागदपत्रे आवश्यक आहे ते पुढीलप्रमाणे पाहूया. यामध्ये आधार कार्ड, मुलीचे किंवा आईचे बँकेचे खाते, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. हे जर कागदपत्रे नसेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. या योजनेचा लाभ 2 मुलीच्या जन्माच्या वेळी मिळतो. तिसरी मुलगी झाली तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. अशाप्रकारे सरकार माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा विकास करीत आहे.

Leave a Comment