Government Scheme : फक्त 55 रुपये जमा करून दरमहा मिळवा 3000 रुपये! सरकारच्या या महत्वकांक्षी योजनेचा लाभ घ्या !

Spread the love

भारत देशातील प्रत्येक नागरिकांसाठी भारत सरकार त्याच्या कपॅसिटीनुसार विविध योजना राबवत आहे. शेतकऱ्यांसाठी देखील विशेष योजना सरकारने आतापर्यंत राबवल्या आहेत. त्या माध्यमातून शेतकऱ्यांनी लाभ घेऊन आर्थिक बाजू व कामाची बाजू भक्कम केली आहे. भारत सरकारने खास लहान यासोबतच अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी व वृद्ध शेतकऱ्यांसाठी एक खास योजना राबवली आहे.

Government scheme : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे व त्यांचे जीवनमान उंच व्हावे ह्या उद्देशाने सरकार विविध योजना राबवत आहे. देशभरातील अनेक शेतकरी शासनाने राबवलेल्या योजनेचा लाभ घेतात. शासनाने राबवलेल्या एका विशेष योजनेबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. जर शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला तर नक्कीच त्यांना फायदा होईल.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेलच या सोबतच विविध फायदे देखील त्यांना मिळू शकतील. मित्रांनो त्या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना.

शेतकऱ्यांच्या अतिशय फायद्याची ठरणारी ही एक महत्त्वाची योजना असून या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना तीन हजार रुपये प्रति महिना पेन्शन सुरू होते. त्यासाठी 60 वर्षे पूर्ण झालेले नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतील. योजनेचा लाभ घेण्यासाठी पी एम किसान मानधन योजनेमध्ये थेट नोंदणी करावी लागणार आहे.

मित्रांनो या योजनेचा लाभ घेत असताना एखाद्या शेतकऱ्याच्या मृत्यू झाला असेल तर त्याच्या पत्नीला कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून जितकी पेन्शन शेतकऱ्याला मिळत होती तितक्या पेन्शनच्या 50% शेतकऱ्यांच्या पत्नीला पेन्शन सुरू होईल. मित्रांनो यामध्ये कौटुंबिक पेन्शन ही फक्त पती-पत्नी दोघांनाच भेटू शकेल त्यामध्ये मुलाचा सहभाग ग्राह्य धरला जाणार नाही.

योजनेबद्दल जाणून घ्या

पीएम किसन मानधन योजना ही केंद्र सरकारची एक महत्वकांविषयी योजना असून या योजनेच्या माध्यमातून साठ वर्षे पूर्ण झालेले नागरिक प्रति महिना तीन हजार रुपये पेन्शन मिळू शकतील. यासाठी योजनेमध्ये सहभाग घेण्याकरिता शेतकऱ्याचे वय हे 18 ते 40 वर्षे असते गरजेचे आहे. ज्या नागरिकांनी 18 ते 40 वर्षांमध्ये या योजनेत गुंतवणूक केली आहे त्यांना वार्षिक 36 हजार रुपये मिळतील. म्हणजेच प्रति महिन्यात तीन हजार रुपये दिले जातील. यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून म्हणजेच 60 वर्षापासून कमीत कमी पन्नास रुपये जास्तीत जास्त दोनशे रुपये प्रत्येक महिन्याला जमा करावे लागतील.

पीएम किसानच्या हप्त्यातून पैसे कापले जातील!

पी एम किसान चे महत्वकांक्षी योजनेअंतर्गत सरकार देशभरातील गरीब जनतेसाठी म्हणजेच गरीब शेतकऱ्यांसाठी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते म्हणजेच वार्षिक सहा हजार रुपये वितरित करत असते. दुसरीकडे त्याच नागरिकांनी पीएम किसन मानधन योजनेमध्ये नोंदणी केली तर ज्यावेळी वयाचे साठ वर्षे पूर्ण होतील त्यावेळी पी एम किसान मानधन योजनेचे 36 हजार रुपये व पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये एकूण 42 हजार रुपये शेतकऱ्याला मिळतील.

नफा कसा आणि किती वाढेल?

पी एम किसान मानधन योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी 18 ते 40 वयोगटांमध्ये कमीत कमी पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दोनशे रुपये प्रत्येक महिन्याला योगदान द्यावे लागणार आहे. या माध्यमातून ज्यावेळी तुमचे साठ वर्षे पूर्ण होतील त्यावेळी तुम्हाला योगदान देण्याची गरज नाही तिथून पुढे तुम्हाला प्रति महिना तीन हजार रुपये पेन्शन सुरू होईल.

Leave a Comment